डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या निधनानंतर वैद्न्यानिक,राजकीय नेते,सहकारी,सर्वानीच भरभरून लिहील.संशोधन ,लेखन,प्रशासन सर्वच पातळ्यावर समाजाभिमुख, विकासाभिमुख,उद्देशाभिमुख अस त्याचं काम राहील.अनौपचारिक सह्जसंवादी अस त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल वर्णन केल गेल.मलाही याचा अनुभव आला.त्यांच्याशी भेट ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अशी घटना आहे.त्याविषयी.
' मी वसंत गोवारीकर बोलतोय 'मी फोन उचलला होता खरा पण दुसर्या बाजुने बोलणारी व्यक्ती? मला फोन का आहे हे लक्षात आल. पण हे अगदी अनपेक्षित,धक्कादायक (सुखद) होत. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता.अवसान गोळा करून मी थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली.
त्याच अस झाल,माझा एम.फिलचा विषय निरंतर शिक्षण हा होता.पुणे विद्यापीठाच्या या विभागाचा १० वर्षाच्या काळाचा आढावा त्यात होता.१९८७ साली मी एम.फिल केल तेंव्हापासून हा विषय डोक्यात खदखदत होता.डॉक्टर गोवारीकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरु झाल्यावर मला आनंद झाला या समाजाभिमुख वैद्न्यानिकापर्यंत माझ म्हणण पोचवाव अस वाटल. मी त्याना एक पत्र आणि सोबत टिळक विद्यापीठाच्या मासिक पत्रिकेत याविषयी आलेला लेख पाठऊन दिला होता.आणि आज त्याविषयी बोलायला हा फोन होता.
दुसर्या बाजूचा आवाज इतका आश्वासक आणि सहज संवादी होता.की माझ्या भीतीची जागा परस्पर सहज संवादात कधी बदलली मला समजलच नाही.त्यांनी लेख बारकाईने वाचला होता.त्याबाबतचे त्यांचे परदेशातील अनुभव सांगत होते.किती वेळ चर्चा चालली होती याच भान नव्हत.बेल वाजली.सर मी जरा दार उघडते,अस म्हणण्या इतका मोकळेपणा आता माझ्यात आला होता.दार उघडल्यावर आत येणार्या माझ्या नवर्याला मी हळूच सांगितलं डॉक्टर गोवारीकर बोलत आहेत.( मी तासनतास फोनवर बोलते याबद्दल नेहमी बोलणी खावी लागतात. मागून याबाबत काही कॉमेंट नकोत म्हणून ही खबरदारी होती).नंतरही कितीतरी वेळ बोलण चालू होत.फोन संपला तरी मी अगदी हवेत होते.भारावलेपण थोड ओसरल्यावर अरे हे सांगायचं राहील ते बोलायला हव होत अस वाटत राहील.मी आभाराच आणि माझी ही भावना व्यक्त करणार
पत्र लिहील.
काही दिवसात दुसरा आश्चर्याचा धका बसला.पुणे विद्यापीठाकडून कुलागुरुनी भेटीला बोलावल्याच पत्र आल.ठरल्याप्रमाणे मी गेले.कुलगुरुंच्या खोलीबाहेर अनेकजण बसले होते.शिपायांनी मला आत बोलावल्याच सांगितलं.कुलगुरुंच्या अलिशान रूमच दडपण,डॉक्टर गोवारीकरांच्या शांत,रुजू,आश्वासक व्यक्तीमत्वाने आणि बोलण्याने कोठल्याकोठे पळाल.थोडी चर्चा झाल्यावर त्यांनी निरंतर शिक्षण विभागाच्या तेज निवळीकराना बोलवून घेतल त्यांच्यासोबतही चर्चा झाली.माझ्याकडे आता सांगायचं राहील अस काही नव्हत.मी पूर्ण समाधानी होते.माझा एम.फिलचा थिसीस मी नेला होता.कुलगुरुनी निवळीकराना तो वाचायला सांगितला.माझ्या एम.फिल डिग्रीपेक्षा माझ्यासाठी हा सर्व अनुभव मोलाचा होता.
डॉक्टर गोवारीकराना पाठवलेल्या लेखाची लिंक सोबत देत आहे.आत्ता तो वाचताना मला स्वत:लाच त्यातला अपुरेपणा,मांडणीतला विस्कळीतपणा,भरपूर संपादनाची गरज जाणवली.अशा कच्च्या लिखाणाची त्यांनी दखल घेतलेली होती.
http://shobhanatai.blogspot.in/2014/01/blog-post_6754.html
' मी वसंत गोवारीकर बोलतोय 'मी फोन उचलला होता खरा पण दुसर्या बाजुने बोलणारी व्यक्ती? मला फोन का आहे हे लक्षात आल. पण हे अगदी अनपेक्षित,धक्कादायक (सुखद) होत. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता.अवसान गोळा करून मी थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली.
त्याच अस झाल,माझा एम.फिलचा विषय निरंतर शिक्षण हा होता.पुणे विद्यापीठाच्या या विभागाचा १० वर्षाच्या काळाचा आढावा त्यात होता.१९८७ साली मी एम.फिल केल तेंव्हापासून हा विषय डोक्यात खदखदत होता.डॉक्टर गोवारीकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरु झाल्यावर मला आनंद झाला या समाजाभिमुख वैद्न्यानिकापर्यंत माझ म्हणण पोचवाव अस वाटल. मी त्याना एक पत्र आणि सोबत टिळक विद्यापीठाच्या मासिक पत्रिकेत याविषयी आलेला लेख पाठऊन दिला होता.आणि आज त्याविषयी बोलायला हा फोन होता.
दुसर्या बाजूचा आवाज इतका आश्वासक आणि सहज संवादी होता.की माझ्या भीतीची जागा परस्पर सहज संवादात कधी बदलली मला समजलच नाही.त्यांनी लेख बारकाईने वाचला होता.त्याबाबतचे त्यांचे परदेशातील अनुभव सांगत होते.किती वेळ चर्चा चालली होती याच भान नव्हत.बेल वाजली.सर मी जरा दार उघडते,अस म्हणण्या इतका मोकळेपणा आता माझ्यात आला होता.दार उघडल्यावर आत येणार्या माझ्या नवर्याला मी हळूच सांगितलं डॉक्टर गोवारीकर बोलत आहेत.( मी तासनतास फोनवर बोलते याबद्दल नेहमी बोलणी खावी लागतात. मागून याबाबत काही कॉमेंट नकोत म्हणून ही खबरदारी होती).नंतरही कितीतरी वेळ बोलण चालू होत.फोन संपला तरी मी अगदी हवेत होते.भारावलेपण थोड ओसरल्यावर अरे हे सांगायचं राहील ते बोलायला हव होत अस वाटत राहील.मी आभाराच आणि माझी ही भावना व्यक्त करणार
पत्र लिहील.
काही दिवसात दुसरा आश्चर्याचा धका बसला.पुणे विद्यापीठाकडून कुलागुरुनी भेटीला बोलावल्याच पत्र आल.ठरल्याप्रमाणे मी गेले.कुलगुरुंच्या खोलीबाहेर अनेकजण बसले होते.शिपायांनी मला आत बोलावल्याच सांगितलं.कुलगुरुंच्या अलिशान रूमच दडपण,डॉक्टर गोवारीकरांच्या शांत,रुजू,आश्वासक व्यक्तीमत्वाने आणि बोलण्याने कोठल्याकोठे पळाल.थोडी चर्चा झाल्यावर त्यांनी निरंतर शिक्षण विभागाच्या तेज निवळीकराना बोलवून घेतल त्यांच्यासोबतही चर्चा झाली.माझ्याकडे आता सांगायचं राहील अस काही नव्हत.मी पूर्ण समाधानी होते.माझा एम.फिलचा थिसीस मी नेला होता.कुलगुरुनी निवळीकराना तो वाचायला सांगितला.माझ्या एम.फिल डिग्रीपेक्षा माझ्यासाठी हा सर्व अनुभव मोलाचा होता.
डॉक्टर गोवारीकराना पाठवलेल्या लेखाची लिंक सोबत देत आहे.आत्ता तो वाचताना मला स्वत:लाच त्यातला अपुरेपणा,मांडणीतला विस्कळीतपणा,भरपूर संपादनाची गरज जाणवली.अशा कच्च्या लिखाणाची त्यांनी दखल घेतलेली होती.
http://shobhanatai.blogspot.in/2014/01/blog-post_6754.html
No comments:
Post a Comment