Thursday 19 April 2018

भिंत

                                      संपूर्णनी दिलेले सर्वच विषय टेम्पटिंग असतात. मला त्यावर भसाभस सुचत असत. पण ते लिहिण्यासाठी प्रकृतीची भिंत आडवी येते.whats app वर मी व्हाईस मेसेज वापरतेआणि मला जे व्यक्त व्हायचे असते ते होऊन घेते.आता या भिंतीला थोड भगदाड पाडून लिहिते.
माणसामाणसातल्या जात,धर्म,वय,लिंग अशा कोणत्याच भिंती माझ्याबाबत नसतात.पण तिच्यात आणि माझ्यात एक भिंत निर्माण झाली होती त्यामुळे तिच्या आणि माझ्या जीवनावर काहीच परिणाम होणार नव्हता त्यामुळे ती तशीच राहिली.त्याच असं झाल. आमच्या कॉलनीत राहणाऱ्या राणी राजांनी यांच्याशी थोडी तोंडओळख होती.उंच,गोऱ्या,ऐटीत कार चालवायच्या..नंतर रस्त्याने जाताना २/४ वेळा दिसल्या पण हसल्याही नाहीत.शिष्ठ दिसतात.मी शिक्कामोर्तब करून मोकळी.एकदा लक्ष्मीरोडला शेवानी यांच्या दुकानात त्या दिसलया.ते त्यांचे नातेवायिक असल्याने गप्पा मारत होत्या. आमची सर्व खरेदी होईपर्यंत त्या तेथेच होत्या.ओळख नाही दिली.भिंत पक्की झाली.अनेक वर्षांनी हास्यक्लबमुळे समोरासमोर आलो.चाफ्याची फुले द्यायच्या.सह्ली,विविध कार्यक्रमातून त्यांचे वेगळेच रूप दिसू लागले.माझ्या मुलीच्या प्रेग्नन्सीच्यावेळी रात्री अपरात्री केंव्हाही बोलवा मी गाडी घेऊन येईन म्हणाल्या.अबोल पण प्रेमळ आज्जी,आई,सासू,शेजारी,मैत्रीण अशी तिची वेगवेगळी रूपे दिसू लागली.तिला शिष्ठ म्हणणे म्हणजे कर्णाला कंजूष म्हणण्यासारखे होते.भिंत पडली नाही,पडली नाही अपोआप गळून गेली.हास्यक्लबमध्ये वाढदिवसाला त्या व्यक्तीबद्दल कोणी कोणी बोलत असते.तिच्या एका वाढदिवसाला मी तिच्याबद्दल गैरसमजापासून झालेल्या बदलापर्यंत सर्व सांगितले.कोणावरही झटकन शिक्कामोर्तब करू नये हा धडा शिकल्याचही सांगितले.राणीनी मला घट्ट मिठी मारली.भिंत पडली नाही,पाडली नाही आपोआप गळून गेली.

Monday 29 January 2018

स्वत:विषयी

                              दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास हे बोधवचन ऐकत आम्ही मोट्ठे झालो.इतरांसाठी जगताना आनंदही मिळत होता.हल्ली तब्येतीच्या तक्रारी सांगितल्या की डॉक्टर,समुपदेशक यांच्याकडून सल्ला मिळतो थोडे काम कमी करा. काही वेळ फक्त स्वत:साठी ठेवा.कळत होते पण वळत नव्हते.
                           त्यादिवशी संगणकावर काम करायचे होते दुखरी कंबर बसू देत नव्हती,चुरचुरणारे,डोळे स्क्रीन कडे पह्यलाही तयार नव्हते.मग हॉट bag मध्ये पाणी भरून कंबर शेकायला घेतली, गुलाब पाण्यात रुमाल भिजवून डोळ्यावर ठेवला आणि स्वस्थ पडून राहिले.शेकणे कंबर सुखावत होती, डोळेही सुगंधी थंडाव्याने शांतवत होते.नकळत शरीर ,मन एक होत होते.किती ताबडवले आपण या शरीराला.प्रेमाने कधी पहिलच नाही. आणि कधी नव्हे ते स्वत:बद्दलच मन प्रेमाने भरून आले कितीकांबद्द्ल सातत्याने कृतज्ञता व्यक्त केली.पण स्वत:च्या शरीराला कधी ती दाखवली नाही.अगदी मनापासून सॉरी म्हटल आणि अगदी प्रेमाने धन्यवद पण.आता शरीराची नस अन नस सुखावत होती.स्वत:च्या श्वासोच्छवासाकडे लक्ष देत कितीतरी वेळ .तशीच पडून राहिले.स्वत:साठी वेळ देण्यातला आनंद समजला होता शरीर न रागावता नव्या जोमाने कामाला उठले.का नाही समजले मला.स्वत:ला थोडा वेळ दिला की त्याबदल्यात दुसऱ्यासाठी वेळ देण्याची ताकद वाढणारच आहे,मी पुन्हा मनापासून मलाच धन्यवाद म्हटले.