Thursday 19 April 2018

भिंत

                                      संपूर्णनी दिलेले सर्वच विषय टेम्पटिंग असतात. मला त्यावर भसाभस सुचत असत. पण ते लिहिण्यासाठी प्रकृतीची भिंत आडवी येते.whats app वर मी व्हाईस मेसेज वापरतेआणि मला जे व्यक्त व्हायचे असते ते होऊन घेते.आता या भिंतीला थोड भगदाड पाडून लिहिते.
माणसामाणसातल्या जात,धर्म,वय,लिंग अशा कोणत्याच भिंती माझ्याबाबत नसतात.पण तिच्यात आणि माझ्यात एक भिंत निर्माण झाली होती त्यामुळे तिच्या आणि माझ्या जीवनावर काहीच परिणाम होणार नव्हता त्यामुळे ती तशीच राहिली.त्याच असं झाल. आमच्या कॉलनीत राहणाऱ्या राणी राजांनी यांच्याशी थोडी तोंडओळख होती.उंच,गोऱ्या,ऐटीत कार चालवायच्या..नंतर रस्त्याने जाताना २/४ वेळा दिसल्या पण हसल्याही नाहीत.शिष्ठ दिसतात.मी शिक्कामोर्तब करून मोकळी.एकदा लक्ष्मीरोडला शेवानी यांच्या दुकानात त्या दिसलया.ते त्यांचे नातेवायिक असल्याने गप्पा मारत होत्या. आमची सर्व खरेदी होईपर्यंत त्या तेथेच होत्या.ओळख नाही दिली.भिंत पक्की झाली.अनेक वर्षांनी हास्यक्लबमुळे समोरासमोर आलो.चाफ्याची फुले द्यायच्या.सह्ली,विविध कार्यक्रमातून त्यांचे वेगळेच रूप दिसू लागले.माझ्या मुलीच्या प्रेग्नन्सीच्यावेळी रात्री अपरात्री केंव्हाही बोलवा मी गाडी घेऊन येईन म्हणाल्या.अबोल पण प्रेमळ आज्जी,आई,सासू,शेजारी,मैत्रीण अशी तिची वेगवेगळी रूपे दिसू लागली.तिला शिष्ठ म्हणणे म्हणजे कर्णाला कंजूष म्हणण्यासारखे होते.भिंत पडली नाही,पडली नाही अपोआप गळून गेली.हास्यक्लबमध्ये वाढदिवसाला त्या व्यक्तीबद्दल कोणी कोणी बोलत असते.तिच्या एका वाढदिवसाला मी तिच्याबद्दल गैरसमजापासून झालेल्या बदलापर्यंत सर्व सांगितले.कोणावरही झटकन शिक्कामोर्तब करू नये हा धडा शिकल्याचही सांगितले.राणीनी मला घट्ट मिठी मारली.भिंत पडली नाही,पाडली नाही आपोआप गळून गेली.