फळांचीओळख
आवरावारी करताना ही मी केलेली कविता सापडली.
आवरावारी करताना ही मी केलेली कविता सापडली.
बंडोबान काढलं फळांचं दुकान
फळं घ्या फळं गोड ताजी छान
लोकांना मिळाली वर्दी
दुकानात झाली एकच गर्दी
काठी टेकत टेकत आले मिस्टर तांबे
खोकत खोकत म्हणाले कसे डझन आंबे
अंतू चिंतू मंडळी, पाहून आली जंजीर
बंडोबाना म्हणाली गोड आहे ना अंजीर
सुलू ताई आल्या, बरोबर होती कुक्कु
म्हणाली आई मला नको काही, घे फक्त चिक्कू
खाड खाड बूट आपटत आले दोन शिपाई
ऐटीत राहूंन उभी, मागितली पपई
डुलत डुलत आले लट्ठमभारती पोंक्षे
सीझन नव्हता तरी म्हणे हवी मला द्राक्षे
स्कुटर थांबवत थोडी म्हणाले सुरेश मंत्री
आहेत का हो तुमच्याकडे नागपुरी संत्री
विद्याताई आली साडी नेसून डाळिंबी
आजोबांसाठी तिला घ्यायची होती मोसंबी
प्रतिभाची मुलं म्हणे खात नाहीत भाजी पोळी
शिकरणाला हवीत तिला रोज घरात केळी
यमुनाताईंची सदा घाई, दोन हवे अननस
लवकर द्या हो नाहीतर चुकेल माझी बस
बंडोबान काढलं फळांचं दुकान
माल गेला संपून व्यापार झाल