अस्स कस्स असत हो?
रविवारच्या मटाच्या पुरवणीत त्यावेळी निवडक कविता यायच्या १४ नोव्हेंबर हा बालदिन असल्याने त्या दिवशीसाठी बालकविता निवडल्या गेल्या.रमेश तेंडुलकर यांनी कवितांची निवड केली होती.एकूण सहा कविता छापूनआल्या होत्या यात .विंदा करंदीकर,पु.शी. रेगे,वसंत बापट,विजया जहागीरदार,शंकर वैद्य,आणि लीलावती भागवत असे दिग्गज होते.आवडलेली कात्रण काढून ठेवायची मला सवय होती.छोट्या मुलांसाठी गीत गायनाची आंतरशालेय स्पर्धा होती.त्यासाठी माझ्या साडेचार वर्षाच्या मुलीला मी यातील विजया जहागीरदार यांची कविता शिकवली.आमच्या कॉलनीत राहणार्या शुभांगी फाटकनी ( आताची शुभांगी कोपरकर) ती हावभावासह निट बसवून घेतली.चवथ्या कडव्यातल 'त्याच जरा शेण खा' शाळेतल्या शिक्षिका,शुभांगी या सर्वांनी सेन्सार केल आणि तिथ 'त्याच्यासारखा वागायला शिका' केल.
देवयानी, कवितेचा शब्द न शब्द अर्थासह पोचवायची.'अस कस असत हो 'ला प्रत्येक वेळी कधी राग, कधी संताप अशी वेगळी भावमुद्रा असायची. तो अभिनय नसायचा तर मनातल्या भावनाच असायच्या स्पर्धेत तिला प्रथम क्रमांक मिळाला.मग शाळेत काही कार्यक्रम असला की देवयानीच 'अस कस असत हो' व्हायलाच पाहिजे.कुठही गेल की प्रत्येक जण तिला हे गाण म्हणायला सांगायचे.परवा आवरा आवरी करताना जीर्ण झालेलं या गीताच कात्रण मिळाल.आणि आठवणी ताज्या झाल्या.इतक्या वर्षानंतर आजही या गीतातील छोट्यांच्या भावना याच असाव्यात.
अस्से कसे असते हो, मोठ्यांचे वागणे?
एकदा एक बोलणे, अन् एकदा एक बोलणे?
अभ्यास केला तर म्हणतात,'पुस्तकातला किडा'|
खेळायला गेलो की म्हणतात,'परीक्षेत रडा'|
लौकर उठलो तर म्हणतील 'नीज अजून थोडा'|
उशिरा उठलो तर लागलीच 'पसरलाय घोडा'|| १ ||
असे कसे असते हो...
एकदा सांगतील 'बाबानो,खर खर बोला'|
खर सांगताच म्हणतील,'निर्लज्ज मेला'|
काम केले तर लागलीच 'चंदू हुशार झाला'|.
चुकले जरा कुठे तर मग 'चंदू'वाया गेला'|| २||
असे कसे असते हो....
एकदा म्हणायचे 'जरा दया करायला शीक'|
केली की म्हणायचे 'बाबा,लावशील मला भीक'|
मी कुणाला ठोकून काढल,की मीच ठरतो चिडकट|
मला कोणी मारले तरी मीच पुन्हा शेळपट|| ३ ||
असे कसे असते हो....
सांगतो तसे दाखले मी मित्रांच्या घरचे|
वस् कन म्हणतील' नको सांगु कौतुक दुसर्यांचे'|
शेजारच्या बाळूचा मात्र पुळका सारखा सारखा|
मला आपले म्हणत राहायचे 'त्याचे जरा शेण खा'|| ४||
असे कसे असते हो....
धीटपणे बोलताच म्हणतील चुरूचुरू करतय तोंड|
गप्प बसावे तर लागलीच 'लाजरच आहे सोंग'|
कधी आजारी पडलो तर तेंव्हा मात्र म्हणतात |
'चंदू आमचा गुणाचा हो 'तेवढच खर बोलतात.|| ५||
असे कसे असते हो....
सौ विजया जहागीरदार ( किशोर दिवाळी ७६)
|.
रविवारच्या मटाच्या पुरवणीत त्यावेळी निवडक कविता यायच्या १४ नोव्हेंबर हा बालदिन असल्याने त्या दिवशीसाठी बालकविता निवडल्या गेल्या.रमेश तेंडुलकर यांनी कवितांची निवड केली होती.एकूण सहा कविता छापूनआल्या होत्या यात .विंदा करंदीकर,पु.शी. रेगे,वसंत बापट,विजया जहागीरदार,शंकर वैद्य,आणि लीलावती भागवत असे दिग्गज होते.आवडलेली कात्रण काढून ठेवायची मला सवय होती.छोट्या मुलांसाठी गीत गायनाची आंतरशालेय स्पर्धा होती.त्यासाठी माझ्या साडेचार वर्षाच्या मुलीला मी यातील विजया जहागीरदार यांची कविता शिकवली.आमच्या कॉलनीत राहणार्या शुभांगी फाटकनी ( आताची शुभांगी कोपरकर) ती हावभावासह निट बसवून घेतली.चवथ्या कडव्यातल 'त्याच जरा शेण खा' शाळेतल्या शिक्षिका,शुभांगी या सर्वांनी सेन्सार केल आणि तिथ 'त्याच्यासारखा वागायला शिका' केल.
देवयानी, कवितेचा शब्द न शब्द अर्थासह पोचवायची.'अस कस असत हो 'ला प्रत्येक वेळी कधी राग, कधी संताप अशी वेगळी भावमुद्रा असायची. तो अभिनय नसायचा तर मनातल्या भावनाच असायच्या स्पर्धेत तिला प्रथम क्रमांक मिळाला.मग शाळेत काही कार्यक्रम असला की देवयानीच 'अस कस असत हो' व्हायलाच पाहिजे.कुठही गेल की प्रत्येक जण तिला हे गाण म्हणायला सांगायचे.परवा आवरा आवरी करताना जीर्ण झालेलं या गीताच कात्रण मिळाल.आणि आठवणी ताज्या झाल्या.इतक्या वर्षानंतर आजही या गीतातील छोट्यांच्या भावना याच असाव्यात.
अस्से कसे असते हो, मोठ्यांचे वागणे?
एकदा एक बोलणे, अन् एकदा एक बोलणे?
अभ्यास केला तर म्हणतात,'पुस्तकातला किडा'|
खेळायला गेलो की म्हणतात,'परीक्षेत रडा'|
लौकर उठलो तर म्हणतील 'नीज अजून थोडा'|
उशिरा उठलो तर लागलीच 'पसरलाय घोडा'|| १ ||
असे कसे असते हो...
एकदा सांगतील 'बाबानो,खर खर बोला'|
खर सांगताच म्हणतील,'निर्लज्ज मेला'|
काम केले तर लागलीच 'चंदू हुशार झाला'|.
चुकले जरा कुठे तर मग 'चंदू'वाया गेला'|| २||
असे कसे असते हो....
एकदा म्हणायचे 'जरा दया करायला शीक'|
केली की म्हणायचे 'बाबा,लावशील मला भीक'|
मी कुणाला ठोकून काढल,की मीच ठरतो चिडकट|
मला कोणी मारले तरी मीच पुन्हा शेळपट|| ३ ||
असे कसे असते हो....
सांगतो तसे दाखले मी मित्रांच्या घरचे|
वस् कन म्हणतील' नको सांगु कौतुक दुसर्यांचे'|
शेजारच्या बाळूचा मात्र पुळका सारखा सारखा|
मला आपले म्हणत राहायचे 'त्याचे जरा शेण खा'|| ४||
असे कसे असते हो....
धीटपणे बोलताच म्हणतील चुरूचुरू करतय तोंड|
गप्प बसावे तर लागलीच 'लाजरच आहे सोंग'|
कधी आजारी पडलो तर तेंव्हा मात्र म्हणतात |
'चंदू आमचा गुणाचा हो 'तेवढच खर बोलतात.|| ५||
असे कसे असते हो....
सौ विजया जहागीरदार ( किशोर दिवाळी ७६)
|.
zhakas! mala purna kavita mahit navhti. ata parat ekda mhanun ghyayla pahije!
ReplyDeleteखूपच सुंदर! शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धेत ऐकली होती
ReplyDeleteमाझ्या भावाने सादर केलेली. आठवणी ताज्या झाल्या पुन्हा!